Maharashtra Weather : राज्यातील हवामानात प्रचंड उलटफेर! आज तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की ऊन पडणार? जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर कमी झाला असून राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडत आहेत, तर अनेक भागांत दमट आणि उष्ण हवामान जाणवत आहे. 21 ऑगस्ट रोजी राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. (Maharashtra Weather)


कोकण विभागातही पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. 21 ऑगस्ट रोजी कोणताही पावसाचा अलर्ट नसून काही भागांत हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. दमट हवामानासोबत काही काळ सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. (Weather Update)



पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र, जोरदार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. घाटमाथ्यावरील भागातही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. ( Weather News)


मराठवाड्यात गुरुवारी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, 21 ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट नाही. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस नसल्याने या भागातील पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणी आणि उभ्या पिकांच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना आहे. (Marathwada Weather)


विदर्भातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस बहुतांश भागात कोरडे, दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. 


एकंदरीत, 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अलर्ट नाही. पुढील चार ते पाच दिवसही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे आणि पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Marathwada Weather)


Comments
Add Comment

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस