Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पावसाच्या स्थितीत पुन्हा बदल होण्याची शक्यता असून अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाच्या सरी सुरू असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्यासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



दरम्यान, नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून नागपूरमध्ये ढगाळ वातावरण असून आज आणि उद्या विदर्भातील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, २६ ते २८ ऑगस्टदरम्यान विदर्भातील बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम विदर्भातील पावसावर होण्याची शक्यता आहे.



गोंदिया जिल्ह्यात २२ ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस धान पिकासाठी फायदेशीर ठरणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.



दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील संकट अद्याप कायम आहे. २९ आणि ३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ५३५ गावांतील ४१ हजार ५५६ शेतकऱ्यांचे सुमारे ३६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर तसेच बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने ३१ कोटी ५५ लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. आता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर