Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच विद्यार्थीहिताचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत. तसेच सर्व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभागाची स्थापना करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. (Chandrakant Patil)


डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांच्या प्रायोजक मंडळाचे अध्यक्ष व कुलगुरू यांच्यासमवेत आढावा बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थीहिताच्या विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,  उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अमोल मुत्याल, तंत्र शिक्षण संचालक प्रमोद नाईक, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांचे कुलगुरू व संबधित अधिकारी उपस्थित होते.



राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत इंटर्नशिप आणि चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी याबाबत विद्यापीठांकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच GER व GPR संदर्भातील माहिती AISHE पोर्टलवर नियमितपणे नोंदवावी आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डवर आवश्यक माहिती अद्ययावत करावी, असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. (Chandrakant Patil)


मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी NAAC व NBA मानांकन मिळविण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. तसेच NIRF रँकिंगमध्ये विद्यापीठांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे APAAR ID तयार करून त्यांचे Academic Bank of Credits (ABC) शी १०० टक्के मॅपिंग पूर्ण करावे. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील संबंधित पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी सुनिश्चित करावी, अशा सूचनाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  दिल्या.


बैठकीत महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियमांतर्गत विद्यापीठांच्या विविध वैधानिक प्राधिकरणांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये  नियामक मंडळ (Governing Body), व्यवस्थापन मंडळ (Board of Management), विद्वत परिषद (Academic Council) आणि परीक्षा मंडळ (Board of Examinations) यांच्या नियमित बैठका होतात का, त्यामध्ये आवश्यक विषयांवर निर्णय घेतले जातात का, तसेच निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होते का, याबाबत माहिती घेण्यात आली. (Chandrakant Patil)


अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने १० टक्के विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्कमाफी देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. विद्यार्थीहिताच्या दृष्टीने विद्यापीठांनी सामाजिक बांधिलकी जपत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी म्हणाले विद्यापीठाचा वार्षिक अहवाल वेळेत सादर करावा.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी