Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या घरांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली असून, ग्रामविकास विभागाने याबाबत जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे.


बागणीतील या ९८ घरांमध्ये दलित समाज, गोसावी समाज तसेच इतर गोरगरीब कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नसून या कुटुंबांच्या निवाऱ्याचा आणि भवितव्याचा प्रश्न होता.


या प्रकरणासाठी माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. नागरिकांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळाले असून, शासनाच्या निर्णयामुळे ९८ कुटुंबांच्या घरांना नियमानुकूलतेचा मार्ग मोकळा झाला आहे.



ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. परवानगी मिळाल्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन शासनाचे आभार मानले.


दरम्यान, या निर्णयामुळे बागणीतील ९८ कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरांच्या प्रश्नाला आता कायमस्वरूपी तोडगा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.


या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सदाभाऊ खोत यांचे बागणी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर