Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित


नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजन


नागरिक नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना



मुंबई : नागपूर जिल्ह्यातील श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत नेपाळमध्ये गेलेले ११० नागरिक सुरक्षित असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नेपाळमधील काठमांडू येथे पर्यटन/धार्मिक भेटीच्या अनुषंगाने गेलेल्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजीच्या महापूराच्या घटनेचा या समूहातील नागरिकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहे. नागरिकांशी सातत्याने संपर्क असून त्यांच्या सद्यस्थितीबाबत नियमितपणे माहिती घेतली जात आहे.नागपूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत हे सर्व नागरिक काठमांडू येथील माहेश्वरी समाज येथे सुरक्षितपणे वास्तव्यास असून, नेपाळ प्रशासनाकडून देखील त्यांना आवश्यक ती मदत व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.



या नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी नियोजित बसऐवजी नेपाळ प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार हे नागरिक २७ ऑगस्ट २०२६ रोजी काठमांडू येथून जनकपूर, नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना झाले असून, २८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेपर्यंत जनकपूर येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. त्यानंतर जनकपूर येथून भारतात प्रवेश करून पुढे पटना येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. पटना येथून दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी दानापूर रेल्वे स्थानकावरून नागपूरकडे येण्यासाठी त्यांची रेल्वेगाडी नियोजित आहे. त्यानुसार या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे नागपूर येथे परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.



नागरिकांच्या नागपूर येथील नातेवाईकांशीही जिल्हा प्रशासनाचा संपर्क असून, त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार समूहातील सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी अंकुश लुडेकर, रा. प्रेमनगर, इतवारी, नागपूर व आशितोष चौधरी, रा. मानेवाडा, नागपूर हे दोन नातेवाईक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. नेपाळमधील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सध्या पूर्णपणे सुरक्षित असून जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाबाबतही जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते समन्वय व देखरेख ठेवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.