Jalgaon News : नदीत बुडणाऱ्या लेकाला वाचवण्यासाठी बाप धावला पण नियतीनं बापालाच हिरावलं , मुलगाही बेपत्ता

Jalgaon News : जळगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील पिता-पुत्र नर्मदा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वडील गणेश शांताराम पाटील (३६) यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे. मात्र त्यांचा ११ वर्षांचा मुलगा लकी गणेश पाटील याचा अजूनही बेपत्ता आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात मोहीम सुरू आहे. लेकाला वाचवण्यासाठी मदतीला धावणाऱ्या वडिलांनाच काळाने हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर मुलगा अजूनही बेपत्ता असल्याने पाटील कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. (Jalgaon News)



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खडके गावातील रहिवासी असलेले गणेश पाटील कुटुंबासह इतर काही कुटुंबा समवेत १९ ऑगस्ट रोजी जबलपूरजवळ नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात गेले होते. सुनील महाराज उर्फ सोनू महाराज यांच्या या आश्रमात नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी अनेक वर्षांपासून अन्नदान केले जाते. याच कारणामुळे परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी भेट देतात. दरम्यान, सर्वजण नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. आंघोळ झाल्यानंतर लकी नदीच्या बाहेर आला. मात्र काही वेळाने त्याच्या पायाला माती लागल्याचे त्याला जाणवले. ती माती काढण्यासाठी तो पुन्हा पाण्याजवळ गेला अन् नियतीने डाव साधला. पाय धुण्यासाठी गेलेला लकी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पुढे गेला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला.(Jalgaon News)



बचाव पथकाने नदी परिसरात शोध सुरू


नदीचा प्रवाह वेगात असल्याने लकीला स्वतःला सावरण्याची संधी मिळाली नाही आणि तो पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. मुलाला संकटात पाहून वडील गणेश पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा जोर इतका जास्त होता की गणेश पाटील हे देखील नदीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने नदी परिसरात शोध सुरू केला. काही काळाच्या प्रयत्नानंतर गणेश पाटील यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र लकीचा अद्याप शोध लागलेला नाही. लकीचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून नदीच्या परिसरात शोध मोहीम सुरु आहे. या घटनेची बातमी खडके गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने पाटील कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे.



तलवारे कुटुंबियांवरही दुःखांचा आघात


दरम्यान,जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यातील खवशी (Khavshi) येथे देखील दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. गाव तलावाच्या पाण्यात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. विरेंद्र उर्फ विरु अण्णा तलवारे (७) आणि त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (३२) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खवशी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी