Chandrapur ashram school food poisoning : चंद्रपुरात भयंकर प्रकार! वरणाच्या पातेल्यात शिजली पाल; आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा!

महाराष्ट्र शासनाने आश्रमशाळांमधील सुविधांबाबत मुंबई उच्च न्यायालयात सकारात्मक माहिती दिल्यानंतर लगेचच ही भीषण घटना समोर आली आहे. जिवती तालुक्यातील नगराळा येथील 'अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळेत' (Amru Naik Secondary Ashram School) दुपारच्या जेवणातून तब्बल ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आश्रमशाळांमधील समस्यांविरोधात सुरू असलेले १७ दिवसांचे उपोषण मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने नुकतेच सुटले होते. मात्र, त्यानंतर लगेच घडलेल्या या प्रकरणामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.


ही घटना मंगळवारी दुपारच्या जेवणाच्या वेळी घडली. सकाळी स्वयंपाकघरात कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी वरण आणि भाजी शिजवण्याचे काम सुरू असताना एक जिवंत पाल नकळतपणे वरणाच्या मोठ्या भांड्यात पडली. दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर मुलांनी पोळी आणि भाजी खाण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी वरण वाढणाऱ्या एका विद्यार्थ्याला पातेल्यामध्ये शिजलेल्या पालीचे तुकडे तरंगताना दिसले. हे दृश्य पाहताच जेवण त्वरित थांबवण्यात आले, परंतु तोपर्यंत अनेक मुलांच्या पोटात दूषित अन्न गेले होते.



दूषित अन्न पोटात गेल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. मुलांना तीव्र मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि चक्कर येऊ लागल्याने शाळेत एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळा प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका बोलावून बाधित मुलांना जिवती येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही मुलांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वीच शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात एका आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता चंद्रपुरात अन्नातून विषबाधा झाल्याची बातमी पसरताच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपल्या मुलांच्या जिवाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पाहून, संतापलेल्या पालकांनी आश्रमशाळेत धाव घेत पाल्यांना सुरक्षितपणे घरी नेण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेनंतर शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील स्वच्छता आणि अन्नाच्या दर्जावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चंद्रपूरचे तत्कालीन पालकमंत्री आणि आदिवासी कल्याण मंत्री अशोक उईके यांच्यावरही या ढिसाळ व्यवस्थापनामुळे चौफेर टीका होत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेश एनसरकार यांनी सांगितले की, ही संस्था आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असली तरी ती थेट आदिवासी विकास विभागांतर्गत नसून 'व्हीजेएनटी' (विमुक्त जाती व भटक्या जमाती) विभागाकडून अनुदानित तत्त्वावर चालवली जाते.

Comments
Add Comment

Jalgaon : चाळीसगावमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारने तीन महिलांना उडवले, एकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेत दिवा लावून पूजा, प्रवाशावर रेल्वेची कारवाई

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली

Dr Sampada Munde Suicide Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; गृह विभागाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात

Maharashtra Weather Update : पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' १३ जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा इशारा

मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आता मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याकडे सर्वांचे

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर