मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आता मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर कमी राहिल्यानंतर पुन्हा हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून १३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ( Rainfall Forecast)
कोकण विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस या भागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते, मात्र सर्वदूर पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. ( Marathwada)
मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित कर्मचाऱ्यांची कमतरता यांसारख्या १२ नियामक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ...
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत सध्या कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ३ सप्टेंबरसाठी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात पावसाची मोठी तूट असल्याने पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ( Yellow Alert)
मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी मात्र सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ( Orange Alert)
दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप कायम असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना स्थानिक हवामान अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. (Monsoon)