मुंबई : मुंबईत ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026’च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी केवळ व्यापार आणि आर्थिक संबंधांच्या माध्यमातून जग अधिक चांगले होणार नाही, तर विविध देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण, मानवी मूल्ये आणि परस्पर संवाद वाढणे गरजेचे असल्याचे सांगितले. ( Global Impact Forum 2026)
जगातील प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असली, तरी मानवतेशी संबंधित अनेक मूल्ये सर्वत्र समान आहेत. या समान मूल्यांच्या आधारावर विविध देशांनी एकमेकांशी संवाद वाढवावा आणि परस्परांचा सन्मान करावा, असे फडणवीस यांनी म्हटले. सध्याच्या काळात जग अनेक पातळ्यांवर विभागलेले दिसत असून अशा परिस्थितीत संवाद आणि सहकार्याची गरज अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Chief Minister Devendra Fadnavis)
मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी फोडताना विटांचा खांब कोसळून त्याखाली दबून 7 ...
भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारधारेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची भावना भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून आहे. भारताने जगाशी केवळ व्यापार केला नाही, तर ज्ञान, विचार आणि जीवनमूल्यांचीही देवाणघेवाण केली. बौद्ध धर्माचा प्रसार हे त्याचे उदाहरण असून, हा प्रभाव युद्ध किंवा संघर्षातून नव्हे तर विचार आणि मूल्यांच्या माध्यमातून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला ब्रिक्स देशांचे राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांसोबत सांस्कृतिक समानता आणि सहकार्याच्या माध्यमातून नवीन भागीदारीच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या मंचातून केला जाणार आहे.(India-Brazil relations)
कार्यक्रमात भारत आणि ब्राझीलच्या सांस्कृतिक संबंधांवर आधारित दृकश्राव्य सादरीकरणही करण्यात आले. दोन्ही देशांच्या संगीत, नृत्य, क्रीडा आणि उत्सव परंपरांमधील साम्य यामधून दाखवण्यात आले. ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या आयोजनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.