मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. सप्टेंबर महिन्यातही अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, आता हवामान विभागाने राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अंदाज दिला आहे. 11 सप्टेंबरपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
कोकणात सध्या पावसाचे प्रमाण कमी असून अनेक ठिकाणी हवामान कोरडे आणि उष्ण आहे. आज या विभागासाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, 12 सप्टेंबरनंतर कोकणातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
62 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न मुंबई : मराठी चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यात अधिकाधिक चित्रपटगृहे ...
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. नाशिकच्या घाट परिसरासाठी उद्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागात पावसाची शक्यता वाढली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत सध्या मोठ्या पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र, पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता असून काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.
मराठवाड्यातही सध्या कोरडे हवामान आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे. हिंगोली आणि नांदेडमध्ये 11 सप्टेंबरपासून हवामान बदलण्याची शक्यता असून त्यानंतर अनेक भागांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
विदर्भात सध्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया परिसरात 11 सप्टेंबरपासून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार सरीही येऊ शकतात.
एकूणच, राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुढील 2 दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.