महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच, आता मध्य प्रदेशातून आणखी एक थरारक घटना समोर आली आहे. बोरखेडा पंचायतीच्या सरपंच ज्ञानीबाई यांचे पती रुमसिंग यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी तब्बल ४० जणांना ताब्यात घेतले आहे.(Borkheda Murder Case)
घटनेची पार्श्वभूमी आणि मृतदेह सापडल्याची माहिती
रुमसिंग हे सकाळी साडेसातच्या सुमारास बोरखेडा येथे गेले होते, जिथे त्यांच्या गिरणीचे आणि पायाभरणीचे काम सुरू होते. ते रात्री नऊच्या सुमारास गावातून निघाले होते, मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह खांडवा-अमरावती राज्य महामार्गाच्या कडेला टांडा ते बोरखेडा या रस्त्यावर आढळून आला. रुमसिंग यांचे तिथे शेत असून ते केळीचा व्यवसाय करत होते.






