मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली असतानाच त्यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायपालिका आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण आझाद मैदान पोलिसांनी दिले आहे. गेल्या आंदोलनावेळी घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन करून अपेक्षेपेक्षा अधिक आंदोलक जमल्याचाही दाखला पोलिसांनी दिला आहे. (Manoj Jarange Patil)
मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून मंत्री उदय सामंत, राधाकृष्ण विखे-पाटील तसेच आमदार प्रसाद लाड यांनी चर्चा आणि शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागण्यांबाबत समाधान न झाल्याने जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघण्याची घोषणा केली आहे. १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. (Manoj Jarange Patil)
पादचारी प्रथम अभियानाला सहकार्य करण्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सवादरम्यान व्यावसायिक ...
या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी जरांगे यांच्या वतीने मराठा आंदोलकांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल तसेच पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे हमीपत्रही देण्यात आले होते. मात्र, आझाद मैदान पोलीस ठाण्याने ही मागणी फेटाळली आहे.
आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी संबंधित पत्रात दक्षिण मुंबईतील सामान्य व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बाधित होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आझाद मैदान येथे आमरण उपोषण आणि आंदोलन करण्यास मागितलेली परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jarange Patil)
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी चार अनारक्षित विशेष फेऱ्या जाहीर ...
गेल्या वेळी जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केले होते, त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचाही पोलिसांनी दाखला दिला आहे. सीएसएमटी परिसर तसेच महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक रस्त्यावर उतरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, असे पोलिसांनी नमूद केले आहे. (Manoj Jarange Patil)
गेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी काही अटी-शर्तींसह आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली होती. त्यावेळी आझाद मैदानावर पाच हजार आंदोलक जमण्याची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या संख्येपेक्षा अधिक आंदोलक जमल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर यावेळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. (Manoj Jarange Patil)