Bihar Flood News : बिहारमध्ये 50 लाख लोक पुराच्या विळख्यात, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

Bihar Flood News : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारमधील १५ जिल्ह्यांतील ५७५ पंचायतींमधील अंदाजे ५० लाख लोक अजूनही पुराच्या पाण्याने प्रभावित झाले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने बिहारमधील २६ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान (Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhan) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकाऱ्यांना केंद्रीय पथकाला नुकसानीची अचूक माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



उत्तर प्रदेशातही पूरस्थिती


उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे २६ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा अंदाजे चार लाख लोकांवर परिणाम झाल्याची माहिती आहे. खगरिया जिल्ह्यातील परबत्ता ब्लॉकमधील माधवपूर पंचायतच्या मुरादपूर गावात गंगेची पाणीपातळी काही प्रमाणात ओसरली असली, तरी पुराचा धोका कायम आहे. याचदरम्यान पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका महिलेला गावातील दोन तरुणांनी वाचवल्याची घटना समोर आली आहे.



उत्तराखंडमध्ये भूस्खलनाचा धोका


उत्तराखंडमध्येही पावसामुळे अडचणी वाढल्या आहेत. पिथोरगडमधील आदि कैलास मार्गावरील दोबत येथे भूस्खलन झाल्याने रस्ता पुन्हा बंद झाला आहे. तर रुद्रप्रयागमधील केदारनाथ ट्रेकिंग मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव चिरबासाजवळून यात्रेकरूंना हेल्मेट घालून पुढे पाठवलं जात आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनात अनेक घोडे आणि खेचरे मृत्युमुखी पडले होते. रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांमुळे दुर्गंधी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.



राजस्थान आणि मध्य प्रदेशातही पावसाचा अंदाज


राजस्थानमधील २६ जिल्ह्यांसाठी १७ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अजमेर, पालीसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. दरम्यान, पश्चिम मध्य प्रदेशात १७ ते १९ सप्टेंबर, तर पूर्व मध्य प्रदेशात १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतही देशातील विविध भागांमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष राहणार आहे.

Comments
Add Comment

India's First Dengue Vaccine : डेंग्यूचा धोका होणार कमी? भारताची स्वदेशी ‘DengiAll’ लस २०२७ मध्ये येण्याची शक्यता

मुंबई : पावसाळा सुरू झाला की भारतात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि प्लेटलेट्स

India Pakistan : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र निषेध

नवी दिल्ली : उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारतीय नौदल आणि पाकिस्तान नौदलाच्या जहाजांमध्ये

UPI Rules : UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; ₹२,००० पेक्षा जास्त व्यवहारावर शुल्क भरावे लागणार का? जाणून घ्या सरकारचे नियम

मुंबई : भारतात डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या माध्यमांपैकी एक असलेल्या युनिफाइड पेमेंट्स

BRICS Family Photo : ब्रिक्सच्या ‘फॅमिली फोटो’त मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकत्र; नवी दिल्लीतील छायाचित्राने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

नवी दिल्ली: १८व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी नवी दिल्लीत काढण्यात आलेल्या एका छायाचित्राने

Amit Shah : भाषा-संस्कृती जपणारे राष्ट्र कधीही गुलाम होत नाही!

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह; ‘डी-कोलोनायझेशन’ म्हणजे इतिहास पुसणे नव्हे, भारतीय दृष्टिकोनातून तो पुन्हा

Seemanchal Express Accident : सीमांचल एक्सप्रेसमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! ट्रेनमधून ९ महिन्यांचं बाळ पडलं; २३ तासांनी सापडला मृतदेह

दिल्लीतील आनंद विहारहून बिहारच्या दिशेने निघालेल्या सीमांचल एक्सप्रेसमध्ये हृदयद्रावक घटना घडली. ट्रेनमधून