‘‘ओ कहते हैं दिल्ली मैं नरेंद्र है, महाराष्ट्र मैं देवेंद्र हैं लेकिन मैं कहता हूँ.. अब रुख जाईए यहा काँग्रेस के लिए पाताल से नारायण आयें है…
नारायण साक्षात विष्णूचे रूप आहे. जेव्हा बदल अपेक्षित असतो तेव्हा नारायणाचे नाव घेऊन पुढे जायला हवे. इथे आपल्यासोबत राणे यांच्यासारखे खंबीर उमेदवार आहेत. विजय आपलाच असेल, असा विश्वास बब्बर यांनी व्यक्तकेला. खेरवाडी मतदारसंघाशी माझे जुने नाते आहे. स्वर्गीय सुनील दत्त यांच्यासोबत मी येथे अनेकदा आलो आहे, असे सांगून ते म्हणाले की, येथील स्थानिकांच्या अनेक समस्या आहेत. अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. मात्र आता येथील लोकांना मोठी संधी चालून आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे येथील लोकांना अभ्यासू आणि खंबीर नेता मिळाला आहे.
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकारमुळे जनता हैराण झाली आहे. अशा वेळी चक्क पाताळातून नारायण अवतरला आहे. जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा प्रथम नारायणाचे नाव घेतले जाते. नारायण प्रकट होतो आणि आपले विघ्न दूर करतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची उमेदवारी खेरवाडीतील जनतेची संकटे दूर करण्यासाठीच आहे. तेव्हा नारायणाचे नाव घ्या आणि बिनधास्त मार्गस्थ व्हा, विजय आपलाच आहे, असे राज बब्बर म्हणाले. या वेळी बब्बर यांच्या भाषणावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून नारायण राणे यांचा विजय असो, अशा जोरदार घोषणा दिल्या.
[EPSB]
शुभशकुनाच्या प्रचंड सभेने वांद्रे काँग्रेसमय »
[/EPSB]