मराठी चित्रपटसृष्टीत रितेशने आधीच निर्माता म्हणून बस्तान बसवलंय. त्याच्या ‘बालकपालक’ या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं.
मराठी चित्रपटसृष्टीत रितेशने आधीच निर्माता म्हणून बस्तान बसवलंय. त्याच्या ‘बालकपालक’ या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं. असो. पण आपल्या करिअरचा सुवर्णकळस गाठायला रितेशला चक्क ११ वर्षाचा कालावधी लागला आहे बरं का? २००३मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्र वगळता संपूर्ण भारतात या चित्रपटाने सुमार कामगिरीच केली होती.
महाराष्ट्रात मात्र हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. काही ठिकाणी तर हा चित्रपट म्हणे २०-२० वेळा दाखवला गेला. आणि प्रत्येक वेळी त्याने चांगला गल्ला जमवला. यावर वावडय़ा उठल्या त्या अशा की, रितेश महाराष्ट्रातील एका मोठय़ा नेत्याचा मुलगा आहे. त्यामुळेच हा चित्रपट सफल झाला. अहो पण; राजकीय कार्यकर्ते जास्तीत जास्त एकदा किंवा दोनदाच चित्रपट पाहू शकतील. १० ते १२ वेळा तिकीट काढून चित्रपट पाहण्यासाठी हाडाचा सिनेप्रेमीच नको का? सामान्य लोकच जेव्हा चित्रपट यशस्वी करतात, तेव्हा अशा वावडय़ा उठवणा-यांच्या तोंडाला आपसूकच टाळं लागतं, बरं का रितेश! त्यांचं सोड; तू आपला असाच यशस्वी हो बाबा!