Home मनोरंजन बीग बी यांनी लिहिले नातींना पत्र

बीग बी यांनी लिहिले नातींना पत्र

1

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दोन्ही नातींना पत्र लिहिले आहे. 

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दोन्ही नातींना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रातून आपल्या नातींना आयुष्यात सक्षमपणे जगाता यावं यासाठी काही सांगितले आहे.

बीग बींनी त्यांची नात नव्या नवेली आणि आराध्या या दोघींना हे पत्र लिहिले असून ते त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. तसेच त्यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये असे सांगितले आहे की, हे पत्र मी आराध्या आणि नव्या नवेली यांच्यासाठी नातही तर प्रत्येक नातीसाठी लिहत आहे.

अमिताभ यांनी या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, ‘सगळ्यात आधी तुम्ही दोघी मुली आहात. आणि तुम्ही मुली आहात म्हणूनच, लोक तुमच्यावर काही विचारांची, सीमारेषांची बंधने घालतील, तुम्ही कुठले कपडे घालायचे, कसे वागायचे, कुठे जायचे,  कुणाला भेटायचे हे सर्व कदाचित लोक ठरवतील. पण लोकांनी दाखवलेल्या मार्गावर कधीच धावू नका, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि तेही शहाणपणाने घ्या.’

‘जेव्हा तुम्हा हे पत्र मिळेल किंवा यामधल्या गोष्टी कळतील, तेव्हा मी कदाचित तुझ्या आजूबाजूला नसेन. पण मी आज या पत्रात जे लिहिले, ते पुढच्या काही वर्षांनंतरही लागू असेल. स्त्री म्हणून जगणे कठीण आहे, तुमचे मार्ग तुम्ही निवडा, तुमचे ध्येय गाठा.  पण तरीही तुम्ही जगापुढे एक वेगळा आदर्श  निर्माण करा. मला जगाने अमिताभ बच्चन म्हणून ओळखण्यापेक्षा तुमचे आजोबा म्हणून जगात माझी ओळख झालेली मला जास्त आवडेल’, असे त्यांनी आपल्या नातींना सांगितले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version