मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आहे. महापालिका आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवत बसले आहेत. परंतू मुंबईतल्या अन्टॉप हिल पोलिसांनी मात्र रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
महापालिका कर्मचा-यांनी वेळेतच खड्डे बुजवले असते तर पोलिसांना आपले कर्तव्य सोडून जीटीबी नगर येथील खड्डे बुजवण्यात वेळ घालवावा लागला नसता.