आरोग्य भरती परीक्षांपाठोपाठ टीईटीच्या तारखेचाही गोंधळ!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आरोग्य विभागातील पदांच्या भरती परीक्षांच्या वेळी गोंधळ झाला असतानाच, आता शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) तारखा ठरविण्यातही गोंधळ झाला आहे. टीईटीची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी जाहीर केली असतानाच, त्याचदिवशी एनईटी (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) होणार आहे. त्याचा फटका राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना बसणार आहे.


या प्रकाराकडे कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले असून, परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. कोरोना आपत्तीच्या काळानंतर राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) घोळ सुरू आहे. यापूर्वी या परीक्षेचे वेळापत्रक तीन वेळा बदलण्यात आले.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याचदिवशी यूपीएससीची परीक्षा होती. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा जाहीर करण्यात आली. त्याचदिवशी आरोग्य विभागाने भरतीसाठी परीक्षा घेतली. त्यामुळे परीक्षेची तारीख ३० ऑक्टोबर करण्यात आली होती.


परंतु, नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे पुन्हा तारीख बदलून २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. मात्र, ही तारीख ठरविताना, केंद्रीय स्तरावरून होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (एनईटी) वेळापत्रक लक्षात घेण्यात आले नाही. एनईटी परीक्षेला २० ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून, ती ५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबर रोजी एनईटीची परीक्षा देणाऱ्या तरुण-तरुणींना टीईटी परीक्षेला मुकावे लागणार आहे.


राज्य परीक्षा परिषदेच्या नियोजनशून्य व बेफिकीर कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांना टीईटी वा एनईटी यापैकी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.


या प्रकाराबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी टीका केली असून यूपीएससी, एमपीएससी आणि परीक्षा मंडळांबरोबर समन्वय साधून टीईटीची परीक्षेची तारीख निश्चित करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : मुंबईच्या इच्छापूर्ती मंडळात अवतरली कोकणातील 'ज्ञानाची पालखी'; बाप्पाच्या चरणी 'विद्या दानाचा' देखावा!

प्राची शिरकर मुंबई : गणेशोत्सव म्हणजे केवळ भव्य देखावे आणि आरास नव्हे, तर 'श्रद्धेतून संस्कृती आणि संस्कृतीतून

Lalbaugcha Raja eco friendly plates : लालबागच्या राजाचा प्रसाद आता 'इको-फ्रेंडली' ताटात; प्लास्टिकला फाटा देत १,५८० किलो कार्बन उत्सर्जन रोखले

मुंबई : 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja 2026) चरणी लीन होणाऱ्या लाखो भाविकांसाठी यंदा एक अत्यंत स्तुत्य आणि

Ganeshotsav 2026 : “स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार - आपले सफाई कर्मचारी!”

सफाई कर्मचाऱ्यांना पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अनोखी मानवंदना! कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांची

Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षांच्या 'बिजली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू!

मुंबई : बोरीवली येथील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (Sanjay Gandhi National Park) एक दुःखद बातमी समोर आली आहे. २०१६

BMC News : महापालिका आयुक्तांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त लावले राणीबागेत ‘सेंच्युरी पाम’

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ अभियान अंतर्गत आणि

Mumbai Police Mounted Unit : मुंबई पोलिसांचे ऐतिहासिक 'घोडदळ' पुन्हा सेवेत; गणेशोत्सवात चौपाट्यांवर सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या पाहता १९३२ मध्ये बंद करण्यात आलेले मुंबई पोलिसांचे विशेष