बारावीचा एकच नव्हे तर तीन पेपर फुटल्याची पोलिसांची धक्कादायक माहिती

निकाल १०० टक्के लागावा म्हणून शाळा व्यवस्थापनानेच पेपर फोडला


मुंबई : बारावी परिक्षेचा फक्त गणिताचाच नव्हे, तर रसायन आणि भौतिक शास्त्राचाही पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे.


बारावी बोर्डाच्या गणिताच्या पेपरफुटीच्या चौकशीदरम्यान फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भांबरे कृषी व विज्ञान ज्युनियर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.


३ मार्चला गणिताचा पेपर फुटण्याआधी २७ फेब्रुवारीला फिजिक्स आणि १ मार्चला केमिस्ट्रीचा पेपर फुटला होता. परीक्षेच्या एक तास आधी विद्यार्थ्यांना व्हॉटसपवरुन पेपर शेअर करण्यात आले होते, असे पुरावे सापडले आहेत.


शिक्षकांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, त्यातून मोबाईलच्या व्हॉटसपचा डाटा मिळवला आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या महाविद्यालयात ३३७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ११९ विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यांचेच महाविद्यालय आले होते. त्यामुळे आपल्या कॉलेजचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून शाळा व्यवस्थापनानेच पेपर फोडला. तसेच प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉटसपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी १० हजार रुपये घेतले.

Comments
Add Comment

Thane Crime: गुटखा तस्करीचा पर्दाफाश! कळवा पोलिसांकडून दोन वॅगनआरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

ठाणे: कळवा पोलिसांनी गुटख्याचा अवैध पद्धतीने व्यापार करणाऱ्यांवर मोठी कारवाई केलेली आहे. पोलिसांनी सापळा रचून

Mumbai Traffic: सिद्धिविनायकाच्या जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, मंदिर परिसरात वाहतुकीचे निर्बंध

मुंबई: मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरामध्ये २९ सप्टेंबरला वाहतूक

Mumbai Metro Accident: मेट्रोच्या बांधकामावेळी विक्रोळीत आणखी एक बळी, लोखंडी बॅरिकेट अंगावर पडून एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील विक्रोळीमध्ये मेट्रोच्या कामावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विक्रोळीतील

IIT Bombay student suicide news : ChatGPT चा वापर अन् दुर्दैवी अंत! IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ; नक्की काय घडलं ?

मुंबई : IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालं आहे.

IIT Mumbai : 'आयआयटी मुंबई'तील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; परीक्षेतील ChatGPT प्रकरण केंद्रस्थानी

मुंबई : आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याचा

Mumbai Municipal Corporation : चौदा फुटाच्या वर झोपड्यांचे बांधकाम, स्वतः तोडा नाहीतर महापालिकेचा हातोडा

१ ऑक्टोबर पासून महापालिकेची थेट कारवाई मुंबई (विशेष प्रतिनिधी) : येत्या १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत