संजय राऊत जेलमध्ये होते तेव्हा राज्यात शांतता होती

पुणे: संजय राऊत जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा राज्यात शांतता जाणवत होती. संजय राऊत तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. आता उन्हाळा सुरू आहे. म्हणून त्यांना परत सरकारी विश्रांतीची गरज आहे असे मला वाटत आहे. त्यामुळे आमच्या समर्थकांच्या भावना दुखवतील अशी विधाने तुम्ही करू नका, असा इशारा शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांना दिला.


आजच्या सामनाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून भाष्य करण्यात आले आहे. त्यावर शंभुराज देसाई यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामनाच्या अग्रलेखाला एक दर्जा होता. मात्र संजय राऊत जेव्हापासून लिहायला लागलेत तेव्हापासून तो दर्जा राहिला नाही. मी आजचा अग्रलेख वाचला नाही. संजय राऊत आता जयंत पाटलाचे प्रवक्ते झाले आहेत. भाकरी ठाकरेंची खातात, मात्र चाकरी शरद पवारांची करतात. ते विश्वप्रवक्ते झाले आहेत. जयंत पाटील कधीही माझ्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव आल्याबद्दल बोलले नाहीत. मग संजय राऊतांना ते स्वप्न पडले होते का? असा सवालच शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा