एक गाव असंही! गाव जपतयं ४३ वर्षे ही परंपरा...

पालघर तालुक्यातील मनोर विभागात असलेले वरई गाव येथे गेल्या ४३ वर्षांपासूनची 'एक गाव, एक गणपती' ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जपली आहे. येथील गावकऱ्यांनी १९४६ मध्ये 'श्रीं' ची मातीची मूर्ती बनवून गणेशोत्सवाला सुरुवात केली. तत्कालीन पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील यांनी व त्यांच्या साथीदारांनी ओम साई मित्र मंडळाची स्थापना केली. ज्याला आज ४३ वर्षे उलटली असून, तेव्हापासून 'एक गाव, एक गणपती' ची परंपरा गावात आजतागायत सुरू आहे.


हे गाव म्हणजे कुणबी, आदिवासी समाजाचे गाव असे ओळखले जाते. गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन पाच दिवसांच्या बाप्पांची स्थापना करतात. गावात प्रथम पूजेचा स्थान जर कोणाला करायचे असेल तर त्यांनी मंडळाला एक महिन्या अगोदर कळवून तो मान मिळवून घेतात, ही परंपरा गेल्या ४३ वर्षांपासून अजतागायत सुरू आहे.


वरईच्या राजाला यावर्षी जगभरात भारताची मान उंचावणारा चांद्रयान ३ चा देखावा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कोणाकडूनही देणगी घेत नाही. ज्यांना स्वखुशीने द्यायचे असेल ते मंडळाजवळ जमा करतात. सकाळ - संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व दिवाबत्ती यथाशक्ती पाच दिवस केली जाते. यामध्ये गावातील सर्व मंडळींचा समावेश असतो. या उत्सव काळात गावातील रस्ते, परिसराची श्रमदानातून साफसफाई केली जाते. अनेक जण व्यसन सोडण्याची शपथ घेतात. गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सवात भजन, कीर्तन, बालनाट्ये, मुलांची भाषणे, स्त्री - भ्रूणहत्या विरोधी जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. तर उत्सव कालावधीच्या पाच दिवस दोन वेळच्या महाप्रसादाचे आयोजन गेल्या ४३ वर्षांपासून साई मित्र मंडळ करीत आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील धोकादायक भोस्ते घाटात केमिकलने भरलेला टँकर भीषण अपघातात दरीत

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात १९ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार? १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात १९ सप्टेंबर रोजी काही भागांत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या

ST Bus Accident : गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात! अनियंत्रित बस उलटून २०-२५ प्रवासी गंभीर जखमी

गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शिवणी (Gadchiroli Bus Accident) नदीच्या पुलाजवळ एसटी बसचा एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला

FDA चा पुण्यातील 'द न्यू पुना क्लब'ला दणका; फरशीवर उंदरांची विष्ठा, अस्वच्छता पाहून अधिकारीही चक्रावले

पुणे: महाराष्ट्रामध्ये अन्न- औषध प्रशासनाचे अधिकारी सध्या सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. सणासुदीनिमित्त

Pune Traffic News: पुणेकरांनो, गणपती दर्शनासाठी जाताय? ‘या’ ६ रस्त्यांवर पार्किंगला बंदी!

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुणेकरांना वाहतूकीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये

Yavatmal Crime News : घरासमोरची कार ठरली चिमुकल्यासाठी काळ, चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू ; नेमकं घडलं काय ?

Yavatmal Crime News : घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची