India-canada tension: कॅनडाच्या लोकांसाठी लवकरच सुरू होऊ शकते व्हिसा सर्व्हिस मात्र...

नवी दिल्ली: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, जर भारताला कॅनडामध्ये आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये प्रगती दिसली तर ते कॅनडाच्या लोकांसाठी लवकरच व्हिसा सर्व्हिस सुरू करू शकतात. ते म्हणाले भारताकडून काही आठवड्यांआधी ही व्हिसा सर्व्हिस अस्थायी काळासाठी थांबवण्यात आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा ही आहे. कॅनडा राजनैतिक अधिकाऱ्यांना सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही आहे जे व्हिएन्ना संधीचे उल्लंघन आहे.


भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध अतिशय तणावपूर्ण झाले आहेत. याचे कारण खालिस्तानी दहशतवादी याचा हरदीप सिंह निज्जर याची हत्या आहे. निज्जरच्या हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केला आहे. सोबतच कॅनडाने भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना ओटावा सोडून जाण्यास सांितले.


भारताने याआधीच निज्जर हत्या प्रकरणात आपला हात नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर प्रत्युत्तराच्या कारवाईत कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना नवी दिल्ली सोडण्याचा आदेश दिला होता. सोबतच कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सर्व्हिस बंद केली होती.



परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?


जयशंकर म्हणाले जर आम्ही कॅनडामध्ये आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत प्रगती पाहिली तर आम्ही व्हिसा सर्व्हिस सुरू करण्याबाबत विचार करू. मी आशा करतो की असे लवकरच झाले पाहिजे. काही आठवड्यांआधी कॅनडामध्ये भारताने व्हिसा जारी करण्याची प्रोसेस बंद केली होती.


परराष्ट्र मंत्र्यांनी आशा व्यक्त केली की सुरक्षा स्थिती अधिक चांगली होईल. ते म्हणाले चांगली सुरक्षा दिल्यास राजनैतिक अधिकऱ्यांना आत्मविश्वासाने काम करणे शक्य होईल. राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा निश्चित करणे वियना संधीचा सगळ्यात मोठा पैलू आहे. आता कॅनडामध्ये अनेक आव्हाने आहेत यामुळे आमचे लोक सुरक्षित नाहीत. आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये प्रगती होताच व्हिसा सर्व्हिस सुरू होईल.


भारतातून नुकतेच ४२ कॅनडाचे राजनैतिक अधिकारी गेले आहेत. त्यांना दिल्ली सोडण्याचा आदेश मिळाला होता.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा