PM Narendra Modi : काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा!

राजस्थानमधून पंतप्रधानांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल


जयपूर : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत असताना अनेक नेते देशभरात दौरे करत आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेदेखील सातत्याने वेगवेगळ्या राज्यांचे दौरे करत आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज राजस्थान दौऱ्यावर पोहोचले. राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर येथील जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजस्थानने प्रत्येक वेळी भाजपाला पूर्ण आशीर्वाद दिला आहे. आज रामभक्त हनुमानजींच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. हनुमान जयंतीच्या संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.


देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा-जेव्हा आपण विभागलो त्यावेळी शत्रूचा फायदा झाला. काँग्रेसची सत्ता असती तर स्फोट झाले असते. त्यांच्या राजवटीत विश्वास टिकवणे कठीण आहे. काँग्रेसने रामनवमीला बंदी घातली तर कर्नाटकात हनुमान चालीसाचे पठण केल्यामुळे मारहाण करण्यात आली. अशा काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा ठरतो आहे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.



काँग्रेसवर साधला निशाणा


काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, २०१४ नंतर आणि आजही दिल्लीत काँग्रेसचे सरकार असते तर काय झाले असते. काँग्रेस असती तर आजही जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या सैन्यावर दगडफेक झाली असती व काँग्रेस सरकारने काहीच केळं नसतं. आजही सीमेपलीकडील शत्रूंनी येवून आमच्या सैनिकांची मुंडकी हिसकावून घेतली असती. सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन लागू झाली नाही, देशाच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट होत राहिले असते. काँग्रेस असती तर भ्रष्टाचाराचे नवे मार्ग शोधले असते असे पंतप्रधानांनी सभेत म्हटले.



काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे गुन्हा


काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा ठरतो. काही दिवसांपूर्वी काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात एका छोट्या दुकानदाराला त्याच्या दुकानात बसून हनुमान चालीसा ऐकत असल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. 'राम-राम' म्हणणाऱ्या राजस्थानमध्ये रामनवमीवर काँग्रेसने बंदी घातली होती, मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना काँग्रेसने सरकारी संरक्षण दिले होते. मात्र भाजपाचे सरकार आल्यानंतर तुमच्या विश्वासावर कोणालाही प्रश्नचिन्ह लावण्याचे धाडस होणार नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले.



मी त्यांच्या राजकारणाचा पर्दाफाश केला


परवा राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी देशासमोर काही गोष्टींच सत्य ठेवलं होतं, त्यामुळे काँग्रेस व इंडी आघाडीत सर्वत्र खळबळ उडाली होती. काँग्रेस तुमची संपत्ती हिसकावून त्यांच्या खास लोकांना वाटून देण्याचं षडयंत्र रचत होते. मोदींनी काँग्रेसच्या या राजकारणाचा पर्दाफाश केल्याने काँग्रेसने त्यांच्यासाठी अपशब्द वापरले होते. काँग्रेस सत्याला इतके का घाबरतात? ते त्यांचे धोरण इतके का लपवतात, त्यांनीच बनवलेली पॉलिसी स्वीकारण्यास ते का घाबरतात? हिंमत असेल तर स्वीकारा, आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.


Comments
Add Comment

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के