Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; 'या' ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन बनतील. महाराष्ट्रातील सुंदर डोंगररांगांमध्ये अशी अनेक मनमोहक ठिकाणे आहेत, जिथे पावसाळ्यात भेट देण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणूनच, आज तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही मान्सूनचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.



१.लोणावळा / खंडाळा-पुणे :- मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली हिरवीगार वन्य शोभा,डोंगरमाथे, दऱ्या, पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे धबधबे हे मनाला मोहून टाकणारे आहेत. पावसाळ्यात इथले सौंदर्य बहरून जाते.



२.ताम्हिणी घाट :- गोवा महामार्गावर मुंबईपासून सुमारे १४० किमी अंतरावर असणारे हे ताम्हिणी घाट पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. हिरवेगार सौंदर्य,खोल दऱ्या,मुळशी धरण, डोंगरावरून पडणारे धबधबे हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. येथे जवळच ३० किमी च्या अंतरावर सिंहगड किल्ला देखील प्रेक्षणीय आहे.



३.माळशेज घाट :- पावसाळ्यात महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांमध्ये माळशेज घाटाचा उल्लेख नक्कीच होतो. समुद्रसपाटीपासून ७ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला माळशेज घाट पावसाळ्यात एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे आणि ट्रेकर्स प्रेमींमध्ये हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात माळशेज घाटात सर्वत्र हिरवळ असते. पावसाळ्यात येथील पर्वत ढगांनी झाकलेले असतात. थंड हवेच्या झुळूकांमध्ये अनेक ठिकाणी सुंदर धबधबेही पाहायला मिळतात.



४.पाचगणी :- पाचगणी हिल स्टेशन हे सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील पाच टेकड्यांनी वेढलेले अतिशय सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेने वेढलेले असल्याने पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अगदी नयनरम्य असते. पाचगणी हिल स्टेशन विशेषतः पावसाळ्यात निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींना आकर्षित करते.



५.इगतपुरी :- इगतपुरी तालुक्याला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच असल्याने इथे वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. भरपूर वनसंपदा आणि जलसंपदा असल्याने प्रत्येकाला निसर्ग अगदी जवळून अनुभवायला मिळतो. भातसा नदीचे पात्र, आर्थर लेक, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहे.



६.भीमाशंकर :- पुण्यातील जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे घनदाट अभयारण्य समृध्द असे ठिकाण आहे. भीमा नदीचा उगमही याच अरण्यातून होतो. हे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य निसर्गाने इथे उधळलेले असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा