Dharashiv water crisis : धाराशिवकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार; पाणीपुरवठा ९ दिवसाआड!

धाराशिव : राज्यात अनेक जिल्ह्यांना एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाणीकपातीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मान्सून तोंडावर आला असला तरीही पाणीटंचाई सहन करावी लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच धाराशिवकरांना आणखी मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.


नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या पंपगृहांना महावितरणमार्फत होणारा विद्युतपुरवठा सध्या सुरू असलेल्या पावसाळी वादळवाऱ्यांमुळे खंडित होत आहे. तसेच उजणीचा जलाशयात पाणीसाठा नसल्याने शहरात अत्यल्प प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहराला नऊ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. म्हणून शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.



मावळ तालुक्यात पाण्याची टंचाई


मावळातील नाणेगावात देखील पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मावळ तालुका हा सर्वात जास्त पर्जन्यमान असणारा तालुका समजला जातो. मात्र तीव्र उन्हाच्या झळांनी मावळ तालुक्यात देखील पाण्याची टंचाई आता भासू लागली आहे. मावळ तालुक्यात मोठी आणि छोटी अशी मिळून ११ धरणे असूनही नाणे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.



नाशिककरांवर दुष्काळाच्या झळा


पाणी टंचाईची टांगती तलवार नाशिककरांवर देखील आहे. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या २४ धरणांपैकी ६ कोरडी पडली आहेत. तर ९ धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात शहरासाठी अवघे ८९९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या परिस्थितीत शहराला केवळ ५४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणीपातळी देखील ५९८ मीटरपर्यंत खालावल्यास जॅकवेलपर्यंत पाणी आणणंही अवघड होणार आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा