Mumbai Rain : मुंबईकरांना दिलासा! वरुणराजा बरसणार तर 'या' भागात वातावरण आणखी तापणार

जाणून घ्या हवामान वृत्त काय म्हणते


मुंबई : देशासह राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पावसाच्या सरी (Rain) कोसळत आहेत. तर केरळमध्ये (Keral) मान्सूनच्या (Monsoon) आगमनाचे संकेत मिळत आहेत. अशातच हवामान विभागाने (Meteorological Department) या आठवड्यात मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्वचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार या भागात आज पावसाच्या सरी कोसळणार असून उन्हाची काहीली कमी होणार आहे. तर अजूनही काही भागात उष्णतेचे तापमान कायम राहण्याचा अंदाज दिला आहे.


मुंबई आणि कोकणात सध्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि काही उपनगरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच शहराचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहिल असे सांगितले आहे.



'या' भागात उष्णतेची लाट


पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्र चांगलाच तापला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस विदर्भातील अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राजस्थानमधील बारमेर येथे उच्चांकी ४८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.


दरम्यान, मुंबई, कोकण परिसरात पुढील दोन दिवसात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता असून १० जूनपर्यंत मुंबई व कोकणात मान्सूनचे आगमन होणार आहे. तर १५ जूनपर्यंत राज्यभरात मान्सून पसरण्याची शक्यता वर्तवली आहे.


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा