Rickshaw Drivers Agitation : रिक्षाचालकांचा आक्रमक पवित्रा; उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा मोठा निर्णय!

प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता


मुंबई : मुंबईसह राज्यात साधारण १५ लाख रिक्षा चालक-मालक स्वयंरोजगारित आहेत. रिक्षाच्या भाड्याचे दर, रिक्षा संचालनासंदर्भातील सर्व अटी व शर्ती राज्य सरकार (State Government) ठरवते. मात्र कोरोना काळानंतर रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यामुळे राज्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा हाती घेत उद्या राज्यभर आंदोलन (Rickshaw Drivers Agitation) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा संचालनासंदर्भात सर्व गोष्टी सरकारकडून ठरवल्या जातात. रिक्षाचालकांना कोरोनाकाळात केवळ १५०० रुपयांच्या मदतीशिवाय अन्य कोणतीही मदत सरकारने केली नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. अशातच वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून ५० रुपये प्रतिदिवस या प्रमाणे रिक्षाचालकांवर विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली उद्या (सोमवारी) राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.


या दिवशी स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ज्या ठिकाणी कार्यालय नसतील त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे, असे संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा