Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा


पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होत असतात. विठुरायाच्या (Vitthal) दर्शनाकडे त्यांचे डोळे लागलेले असतात. मात्र, पंढरपूरच्या (Pandharpur) मंदिरात दिल्या जात असलेल्या व्हीआयपी दर्शनामुळे (VIP darshan) रांगेतील भाविकांना अनेकदा ताटकळत उभं राहावं लागतं. आता आषाढीच्या पार्श्वभूमीवर हे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे रांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


आषाढी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गर्दी वाढत आहे. लांब रांगा लागत असून आलेल्या भाविकांना लवकर दर्शन घेता यावे असे नियोजन मंदिर समितीने केले आहे. त्यातच व्हीआयपी दर्शन आता बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाविकांची दर्शन रांग लवकर पुढे सरकणार आहे. आजपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे.


आजपासून विठुरायाचे २४ तास पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत दर्शनाची रांग गेली आहे. जवळपास दहा पत्रा शेडपैकी पाच पत्राशेड भाविकांच्या गर्दीने भरले आहेत. पुढील दिवसात भाविकांची आणखी गर्दी होण्याची शक्यता देखील आहे.


Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा