RSS Chief Mohan Bhagwat : ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांवर आणा ताबा, सरसंघचालक भागवतांनी केंद्राचे टोचले असे कान

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत विजयादशमी उत्सवात यांनी हिंदू जागर केला. पाकिस्तान, बांगलादेशच नाही तर जगभरातील हिंदूंच्या हक्क रक्षणासाठी केंद्र सरकारने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केलं. नागपूरमध्ये पार पडलेलया विजयादशमी उत्सवात त्यांनी अनेक मुद्यांवर सरकारचे कान धरले आहेत. मोहन भागवत यांनी सरकार आणि हिंदूंना दुर्बलता हा अपराध असल्याचं थेट आवाहन केलं आज. अत्याचार सहन न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर त्याचवेळी सरसंघचालकांनी प्रामुख्याने ओटीटीच्या माध्यमातून पसरत असलेल्या अश्लिलतेवर त्यांनी प्रहार केला.




आपल्याला वेळेवर जागं व्हायचं आहे


बांगलादेशामध्ये अशी चर्चा आहे. भारत आपला शत्रू आहे. पाकिस्तान आपला मित्र आहे. तिथे अशी चर्चा आहे. असे नॅरेशन होत आहे. बांगलादेशामध्ये जे घडलं तसं घडण्यासाठी भारतात होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. संस्थांना कब्तात घ्यायचं, शिक्षण संस्था, विद्यापीठ, माध्यम या द्वारे समाजात विचारांची विकृती पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सरसंघचालकांनी केला आहे. आपल्या लोकांना आपणंच शिव्या देण्याचं वातावरण निर्माण केलं जातं आहे. लोकांना उग्र करुन, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न. यामुळे त्या देशावर बाहेरुन वर्चस्व करणं सोप होतं. कारण आता युद्ध करणं सोपं नाही, त्यामुळे हे केलं जात आहे. देशात अशांतता पसरवण्यासाठी बाहेरील शक्तीला देशात मदत मिळतेय. देशात लोकशाही पद्धतीत अनेक पक्ष आहे. पर्यायी राजकारणाच्या आड येऊन हा अजेंडा सुरु झाला आहे. भारताच्या सिमाभागात याबाबतचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे आपल्याला वेळेवर जागं व्हायचं आहे. एक राष्ट्रीय नॅरेटीव्ह चालवायला लागेल. अभियान चालवावं लागेल. समाजाला संरक्षित ठेवण्यासाठी याची गरज आहे.




अश्लिल कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची गरज


काही लपून राहत नाही. मीडिया सर्वत्र पोहोचली आहे. मोबाईल घरा घरात पोहचला आहे. तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. जो नशा करत नाही. त्याला मागास समजलं जातंय. एका सिस्टम हरण झालंय रामायण झालंय. कोलकात्यामध्ये काय झालंय. तिथे डॅाक्टरांसोबत सर्व देश उभा राहीला. सर्वत्र असं होतंय. गुन्हे आणि राजकारणाचं मिलन झाल्याने असं होत असल्याचा आरोप सरसंघचालकांनी केला आहे.


विषमता येवढी वाढली की आपले संत आम्ही वाटले. वाल्मीत जयंती फक्त वाल्मीकी समाजातंच का व्हावी. सर्व समाजानं करावं. समाजात काय धोके आहे. याची माहिती आपल्या समाजात देणं गरजेचं आपल्या भागातील समाजाची एक समस्या आपण दूर करायला हवी. आपल्यात ज्या दुर्बल जाती आहे. त्यासाठी आपण काय करायचं , हे ठरवायला हवं. समाजामध्ये वेगवेगळ्या जातीमधील लोक एकत्र बसून काम करतात. तर समाजात सद्भावना राहिल, असं त्यांनी म्हटलंय. ओटीटीवर चालणाऱ्या अश्लाघ्य, अश्लिल कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची गरज आहे. व्यवस्थित चालायचं असेल तर मिळून चालण्याचा शास्र आहे. संविधानाची प्रस्तावना, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व,आणि अधिकार हा विचार समाजात पोहोचायला हवा. नेहमी सतर्क रहावं जेनेकरुन आचरण चांगलं राहिल, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.



Comments
Add Comment

LPG Cylinder : १ ऑक्टोबरपासून LPG सिलिंडर बुकिंगचे नियम बदलणार; अनुदानित सिलिंडरसाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य

मुंबई : घरगुती LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑक्टोबर २०२६पासून अनुदानित दरात घरगुती

Bhopal News : ‘टीव्ही पाहायला सांगितलं, लग्नाच्या तयारीवरही बोलणं झालं’ अन् काही तासांतच अनर्थ; कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातील प्रसिद्ध बगलामुखी मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या ओडिशातील एका

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना; Video Viral

देश: बऱ्याचदा रिकामा रस्ता दिसला की, आपण अनावधानाने चालतो. पण हेच अनावधानाने चालणं केव्हा आपल्या अंगाशी येईल,

Medical store CCTV : प्रत्येक मेडिकल स्टोअरवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर! सरकारचा नवा प्रस्ताव; पण औषध विक्रेत्यांचा विरोध का?

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा मोठा प्रस्ताव समोर

UPI transaction charges news : ₹२,००० पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क; मुंबईतील व्यापारी चिंतेत, ग्राहकांमध्ये नाराजी

मुंबई : युपीआय (UPI) पेमेंट प्रणालीबाबत समोर आलेल्या एका नव्या प्रस्तावामुळे मुंबईतील व्यापारी आणि सर्वसामान्य

BCCI AGM : BCCIच्या वार्षिक बैठकीत IPL, बजेट अन् शताब्दी सोहळ्याबाबत मोठे निर्णय; जाणून घ्या १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) शुक्रवारी, १८ सप्टेंबर २०२६ रोजी