Raju Shetty : राजू शेट्टींची मोठी उडी; स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार!

बेळगाव : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) कोणत्याही राजकीय पक्षाशी हातमिळवणी करणार नाही, तर स्वतंत्रपणे सर्व जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. याबाबत नियोजन सुरू असून लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.


महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे धोरण एकच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘परिवर्तन महाशक्ती’च्या नावाखाली राज्यातील छोटे पक्ष एकत्रित करून संघटना बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असणाऱ्या नेत्याची हत्या केली जात असेल तर सर्वसामान्यांचे रक्षण हे सरकार काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा