CNG : निकालाआधीच सीएनजी गॅस दोन रुपयांनी महागला

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आणि निकालाआधी महाराष्ट्रात सीएनजी गॅसच्या दरात दोन रुपयांनी वाढ (CNG Price Hike) करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत.


मुंबईसह महानगरचे गॅस ज्या ज्या भागांमध्ये वापरले जातात तिथे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीनंतर गॅस आता ७७ रुपये प्रति किलोग्रॅम मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्ट वाढवल्याने एमजीएलने दरात वाढ केली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदीत वाढ आणि इतर ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याने कंपनीने गॅसचे दर वाढवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बाजार स्थिर नाही. शिवाय तेलाच्या किंमतीतही सतत बदल होत आहेत. त्याचे परिणाम देखील जगभरात दिसून येत आहेत.


कंपनीने याआधी जुलै महिन्यात सीएनजीची किंमत वाढवली ((CNG Price Hike)) होती. सीएनजीच्या दरात किलोमागे १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सीएनजीची किंमत ७५ रुपये किलो होती. आता २ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा