Nagpur: नागपूर मध्ये शालेय सहल घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात;अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर: नागपुरात विद्यार्थांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज, मंगळवारी सकाळी 9 वाजता घडली. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार नागपुरातील शंकरनगर परिसरातील सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आज, मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथे जात होती. एकूण 5 बसेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेऊन चालल्या होत्या. त्यापैकी 4 बस सुखरूप पुढे गेल्या परंतु, शेवटी असलेल्या बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ मिहान परिसरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा