जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
या पोस्ट मध्ये लिहलं आहे कि, "राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावरील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले.आपल्या जिवलगांना गमावलेल्यांप्रती माझ्या शोकसंवेदना.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो.स्थानिक प्रशासन मदत कार्य करत आहे.मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल."