Vande Bharat Express : अरे बापरे! जायचं होतं गोव्याला, पण पोहोचली कल्याणला

वंदे भारत एक्स्प्रेस मार्ग भटकताच हडबडली रेल्वेची सुरक्षा यंत्रणा


मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगावपर्यंत धावणारी देशातील आधुनिक ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात हरवली. दिवा स्थानकातून ही गाडी पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने वळली. दरम्यान मार्ग बदलल्याचे लक्षात येताच रेल्वेची सुरक्षा यंत्रणा हडबडली. दरम्यान ही गाडी घाईघाईने कल्याण स्थानकावर नेण्यात आली. तेथून काही वेळाने ही गाडी पुन्हा दिवा स्थानकात परतली आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू ठेवला. या बिघाडामुळे ट्रेन ९० मिनिटे उशिराने पोहोचली.


रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी दिवा-पनवेल मार्गावर जाणार होती, जो कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी नियुक्त मार्ग आहे. मात्र ही गाडी सकाळी ६:१०वाजता दिवा स्थानकाच्या पुढे कल्याणच्या दिशेने वळली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नलमधील त्रुटीमुळे हा गोंधळ उघडकीस आला आहे. वास्तविक, दिवा जंक्शन येथे डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला.



त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल ट्रेन सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अनियमितता समोर आल्यानंतर ही गाडी कल्याण स्थानकात नेण्यात आली आणि काही वेळानंतर ही गाडी दिव्याला परत पाठवण्यात आली. दिवा येथे पोहोचल्यानंतर ही गाडी दिवा-पनवेल या निश्चित मार्गाने मडगावकडे रवाना झाली.



सुमारे ३५ मिनिटे थांबली होती ट्रेन


मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस दिवा जंक्शनवर सकाळी ६:१० ते ७:४५ या वेळेत सुमारे ३५ मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली होती. ते म्हणाले की, गाडी पाचव्या मार्गाने सायंकाळी ७.०४ वाजता कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर पोहोचली आणि सहाव्या मार्गाने सायंकाळी ७.१३ वाजता पुन्हा दिवा स्थानकात आणण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जून २०२३ मध्ये सीएसएमटी-मडगाव या मार्गावर सुरू करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पहाटे ५.२५ वाजता सुटते आणि त्याच दिवशी दुपारी १.१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उपनगरीय स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा जोरदार मजबूत आहे. त्यामुळे येथे अशा घटना फार कमी आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा