सरपंच हत्याकांड प्रकरणी राज्यभरातील ग्रामपंचायत बंद

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त दोषींवर कडक कारवाईची मागणी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी संरक्षणासाठी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी राज्यभरात ग्रामपंचायत बंद आंदोलन करण्यात आले.


राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहूतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले.


महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती बंद राहिल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे निर्माण झालेला असंतोष ग्रामीण महाराष्ट्रात दिसून आला. तसेच सरपंच व त्यांचे सहकारी कर्मचारी हेही त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायद्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभर दिसून आले.



सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचने नुसार राज्यातील सर्वच विभागात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे बंद पळून त्याला चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील सरपंच उपसरपंच कर्मचारी काही गावातील गावगुंडा पासून भयभीत झालेले आहेत समाजसेवा करताना अनेक जण यांच्या दबावाखाली काम करत आहेत तेलंगणा व राजस्थान मधील न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे सरपंचाच्या फिर्यादी नुसार शासकीय कामातील अडथळ्याचा गुन्हा गाव गुंडावर दाखल करावा अशी मागणी केली.


यावेळी अध्यक्ष जयंत पाटील यांनी शासना कडे विविध मागण्या केल्या यात सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी कायदा असावा , ग्रामसभेला काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते यामुळे प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण असावे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच त्यांचे गावमध्ये स्मारक उभा करण्यात यावे सरपंचाला भविष्यात सुरक्षितता लाभण्या साठी त्यांना पेन्शन योजना तसेच त्यांना विमा संरक्षण शासना तर्फे देण्यात यावे.

Comments
Add Comment

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा; मुंबई-कोल्हापूरदरम्यान 4 विशेष रेल्वे धावणार

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी जाण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या

Pune News: पुण्यात अन्न- औषध प्रशासनाची मोठी कारवाई, ऐन सणासुदीच्या काळात पनीर- खवा जप्त

पुणे: सणासुदीच्या काळामध्ये अन्न- औषध प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आलेलं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसह

Food Poising Case : खिचडी खाल्ली अन् मृत्यू ओढावला ! मुलाचा मृत्यू तर कुटुंबातील तिघांची मृत्यूशी झुंज सुरु; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं ?

Food Poising Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. खिचडी खाल्यानंतर एका

Pune Ganeshotsav : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात ‘या’ दिवसांमध्ये दारूविक्री बंद, आदेश जारी

पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून, पुणे शहरात बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Bhandara Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात; आयशर ट्रकला ट्रॅक्सची धडक, 8 मजुरांचा जागीच मृत्यू

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि