Harihareshwar Olive Ridley : हरिहरेश्वर येथील सागरात झेपावली ऑलिव्ह रिडलेची पिल्ले

श्रीवर्धन : ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या निसर्गप्रेमी व वन विभागाच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीत सुरू झालेल्या चळवळीला यंदा तब्बल बावीस वर्षे पूर्ण होत आहेत. यंदाच्या हंगामातील पहिली ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची ८९ पिले शनिवार व रविवार श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील सागरात झेपावली. संवर्धन केलेल्या अंड्यांतून जन्माला येणारी कासवाची पिल्ले टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती श्रीवर्धन कांदळवन कक्षाकडून देण्यात आली.



हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर २० वर्षांपासून ही सागरी कासवांचे संवर्धन करण्याची मोहीम वन विभाग, पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांच्या सहयोगातून राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरअखेर किंवा मार्च, एप्रिलदरम्यान कासव अंडी देण्यासाठी येतात. अंडी दिल्यावर मादी समुद्रात निघून जाते. ज्या ठिकाणी मादी अंडी देते त्या जागेला कासवाचे 'घरटे' असे म्हटले जाते. ही घरटी संरक्षित करण्याचे काम बावीस वर्षांपासून श्रीवर्धन तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर सुरू आहे.


पूर्वी मादी कासव साधारण २०० ते २५० अंडी द्यायची; परंतु वातावरणातील बदलामुळे हे प्रमाण १०० ते १५० पर्यंत आले आहे. ही अंडी विशिष्ट पद्धतीने वाळूत खड्डा करून ठेवली जातात. साधारणपणे ४५ ते ६५ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर यायला लागतात. अंड्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या पिल्लांना साधारण तीस मिनिटांत समुद्रात सोडावे लागते. भरतीमुळे कासवांच्या घरट्यांना धोका उद्भवतो, त्यामुळे कासवमित्रांकडून ही अंडी सुरक्षित ठेवली जातात.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा