Chandrashekhar Bawankule : अमरावती-दिल्ली विमानसेवा होणार सुरु - चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती : अमरावती विमानतळावरून येत्या १६ एप्रिलपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे, ही अमरावतीकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर अमरावतीहून पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे, याचा आपल्याला विशेष आनंद आहे. पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मार्ग १६ तारखेला अमरावतीला उघडणार आहे. अमरावती-मुंबई या विमानसेवेनंतर इतर ठिकाणीही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. अमरावती-दिल्ली विमानसेवा देखील सुरू करणार आहोत, असे आश्वासन महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी येथे दिले.


श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे होते. कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके आदी उपस्थित होते.



चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अमरावतीहून आता नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी अमरावतीला येत आहोत. अमरावतीला विमानसेवेची सुविधा आवश्यक होती, ती आता पूर्ण झाली आहे. पश्चिम विदर्भाच्या विकासाचे दार खुले होणार आहे. आपला महाराष्ट्र, विदर्भ विकसित झाला पाहिजे, हे स्वप्न डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बघितले होते. विशेषत: कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, ही त्यांची तळमळ होती.


बावनकुळे म्हणाले, मी देखील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. माझे शिक्षण या संस्थेच्या शाळेतच झाले आहे. माझ्याकडे महसूल विभाग आहे. संस्थेसाठी जमीन देण्यास मी तयार आहे. संस्थेसाठी एकाच ठिकाणी शैक्षणिक संकुल उभारायचे असेल, तर त्यासाठी देखील सरकार मदत करण्यास तयार आहे. या शिक्षण संस्थेला आधुनिक संसाधनांची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली, ती निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल.

Comments
Add Comment

Marathwada Liberation War Day : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात; मराठवाड्यातील दुष्काळमुक्तीसाठी कृष्णाखोरे आणि कोकणातील पाणी आणणार- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Marathwada Special : मराठवाडा विशेष ! 17 सप्टेंबरचा स्वातंत्र्यसंग्राम ते आजचा मराठवाडा; जाणून घ्या या भूमीची संपूर्ण कहाणी

Marathwada Special : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला... पण भारताचा एक भाग असा होता, ज्याला स्वातंत्र्यासाठी आणखी १३ महिने

Weather Update : राज्यात पावसाची पूर्ण उघडीप! 17 सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्यांना मिळणार दिलासा? जाणून घ्या हवामान खात्याने काय दिला इशारा...

Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यातही पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Maharashtra Government : रेशन कार्डापासून परवान्यांपर्यंत सेवा होणार जलद; अन्न व नागरी पुरवठा विभागात GPR अंतर्गत मोठ्या सुधारणा

मुंबई : नागरिकांना शासकीय सेवा अधिक पारदर्शक, सुलभ, कालबद्ध आणि डिजिटल पद्धतीने मिळाव्यात, यासाठी अन्न, नागरी

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करा - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्रलंबित विकासकामे वेळ न दवडता पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना तसेच

Kolhapur News : कळंबा कारागृहात कैद्यांचा उच्छाद; गोंधळ रोखणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सहा जणांचा हल्ला, दगडफेकीत हाताला दुखापत

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात गोंधळ घालणाऱ्या कैद्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरिष्ठ तुरुंग