Raigad : शेकापच्या जयंत पाटील यांच्या घरात फूट

मुंबई : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार पंडीत पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी आस्वाद पाटील यांच्यासह शेकापच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. शेकापचे नेते जयंत पाटील यांचे पंडीत पाटील हे भाऊ आहेत, तर आस्वाद पाटील हे जयंत पाटील यांच्या भगिनी माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आहेत. पंडीत पाटील आणि आस्वाद पाटील यांनी शेकापला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या घरातच राजकीय फूट पडली आहे.



रविंद्र चव्हाण यांनी पंडीत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भाजपात स्वागत केले. शेकापच्या जुन्या आणि नव्या पिढीने एकत्रितपणे भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे रायगड जिल्हा शत प्रतिशत भाजपा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचा उत्तम जनसंपर्क आहे आणि ते तळागाळातल्या लोकांसाठी काम करतात. या सर्व सदस्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा भाजपाला लाभ होईल; असेही भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते.





रायगड जिल्ह्याच्या विकासाकरिता भाजपात राहून काम करणार असल्याचे पंडीत पाटील म्हणाले. रायगड जिल्ह्यातील अपुरे प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, वडखल ते थळ प्रवासी रेल्वे व्हावी यासाठी पाठपुरावा करू; असेही पंडीत पाटील म्हणाले. मविआत असताना अनंत गीतेंचा प्रचार केला. पण निवडणुकीत हरल्यावर गीतेंनी माझा फोन घेणेच टाळले. महायुतीच्या विरोधात प्रचार केला तरी रायगड जिल्ह्यातील त्यांचे नेते विकासाच्या प्रश्नांसाठी मनमोकळा संवाद साधतात. खासदार तटकरे पण कधीही कॉल उचलतात; असे पंडीत पाटील म्हणाले.

अनेक नद्या उपनद्या पुढे गंगेला जाऊन मिळतात. गंगा ही मोठी नदी आहे. हाच विचार करुन रायगड जिल्ह्याच्या विकासाचे काम करण्याकरिता भाजपात प्रवेश केल्याचे पंडीत पाटील यांनी सांगितले. एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सुनील तटकरेंना जे मदत करतात, त्यांना तटकरे मदत करत नाहीत, हा त्यांचा नेहमीचा स्वभाव आहे; असे सांगितले. शेकापने विविध पक्षांसोबत आघाडी केली. मात्र त्याचा लाभ आघाडी केलेल्यांना झाला, शेकापला झाला नाही. असेही पंडीत पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देतेवेळी सांगितले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळणार याचे उत्तर महाराष्ट्र दिनापर्यंत अर्थात १ मे पर्यंत तरी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजनाची बैठक अर्थमंत्र्याकडे झाली, हे लोकशाहीला घातक असल्याची टीकाही पंडीत पाटील यांनी केली.
Comments
Add Comment

Dr Sampada Munde Suicide Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; गृह विभागाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात

Maharashtra Weather Update : पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' १३ जिल्ह्यांमध्ये धो-धो पावसाचा इशारा

मुंबई : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानंतर आता मान्सूनच्या शेवटच्या टप्प्याकडे सर्वांचे

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल