पाकिस्तानी उड्डाणांना भारतीय आकाशात नो एंट्री, भारताने २३ जूनपर्यंत वाढवली बंदी

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान भारत सरकारने पाकिस्तानची विमाने आणि सैन्य उड्डाणांवर आपल्या हवाई क्षेत्रातील बंदी २३ जून पर्यंत वाढवली आहे. हा निर्णय गेल्या महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आला. या हल्ल्यात २६ निर्दोष नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.


शुक्रवारी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार नवीन नोटीस जारी करण्यात आली. यानुसार पाकिस्तानच्या कोणत्याही एअरलाईन्सच्या उड्डाणांना भारतीय आकाशा प्रवेश दिला जाणार आहे. यात सैन्याच्या विमानांचाही समावेश आहे.



पाकिस्तानने वाढवली होती बंदी


हे पाऊल अशा वेळेस उचलले जेव्हा दोन दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की पाकिस्ताननेही सर्व भारतीय विमानांना आपल्या एअरस्पेसची बंदी एक महिन्यांनी वाढवली होती.


पाकिस्तानने पहिल्यांदा २३ एप्रिलला भारतीय विमानांसाछी एअरस्पेस बंद केले होते. पहलगाम हल्ल्यानंतरचा तो दिवस होता.



काय सांगतात नियम?


आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमानुसार एअरस्पेसवरील बंदी अधिकाधिक एक महिन्यांसाठी लावता येते. त्यानंतर पुन्हा रिन्यू करावी लागते. भारताने पाकिस्तानच्या विमानांना बंदी मेमध्ये जाहीर केली होती. यात पाकिस्तानच्या सर्व विमानांवर बंदी घालण्यात आली होती. भारताने ही बंदी लावत स्पष्टपणे दाखवले होते की जोपर्यंत सीमेवर दहशतवाद बंद होत नाही तोपर्यंत हवाई संपर्कही शक्य नाही.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा