अलिबाग नगरपालिकेची हद्द वाढवणार

ग्रामपंचायतींकडे मागविल्या ना-हरकती


अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपालिकेची हद्द खूपच लहान असून, चेंढरे, वरसोली, वेश्वी आणि कुरूळ या ग्रामपंचायतींचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या तोंडी आदेशानुसार अलिबाग नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी सचिन बच्छाव यांनी हद्दवाढीबाबत ग्रामपंचायतींकडून हरकती मागवल्या आहेत. दरम्यान, बच्छाव यांच्या भूमिकेबाबत शेतकरी कामगार पक्षाकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.


कोणत्याही प्रकारची बैठक न घेता, लेखी सुचना न घेता मुख्याधिकाऱ्यांनी आमदारांच्या तोंडी आदेशावर काढलेले पत्र नियमबाह्य असल्याने हद्दवाढीची प्रक्रिया बेकायदा असल्याचे शेकापच्या नेत्यांचे म्हणणे आहे.


सध्या अलिबाग नगर परिषदेचा कारभार मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून सचिव बच्छाव यांच्या देखरेखीखाली सुरू आहे, तर वेश्वी ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून सुरू असल्याने विरोध कमी होईल, या संधीचा फायदा घेत हद्द वाढीसाठी हरकती मागविल्या आहेत.


अलिबाग नगरपालिकेसह लगतच्या चेंढरे, वरसोली, वेश्वी आणि कुरूळ या ग्रामपंचायती एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिपत्याखाली होत्या. या ग्रामपंचायती आता अलिबाग नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अलिबाग नगरपालिकेची सध्याची हद्द जेमतेम सहा चौरस किलोमीटर इतकीच आहे.


लगतच्या ग्रामपंचायतींना सहभागी करून घेतल्यानंतर ही हद्द २५ चौरस किलोमीटरपर्यंत वाढणार आहे. शहरातील सध्या पाणीप्रश्नासह वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अपूर्ण रस्त्यांच्या कामाचा फटका अलिबागकरांना बसत आहे.


अगदी छोट्याशा जागेत अलिबाग शहर वसल्याने त्यास बकालपणा येत आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांबाबत अलिबागकर त्रस्त झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यास मुख्याधिकारी उदासीन ठरत आहेत. चेंढरे ग्रामपंचायतीलाही पत्र देऊन ना हरकत दाखला मागितला आहे.




विविध कार्यालयांना वाव


आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेल्या तोंडी आदेशानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हद्दवाढीने अलिबाग शहराचा सुनियोजित विकास करता येईल. त्याचबरोबर वरसोली, चेंढरे, वेश्वी, कुरूळया ग्रामपंचायतींचा योग्य विकास होईल. २५ चौरस किलोमीटर हद्दीत जिल्ह्याची विविध कार्यालये सुरू करता येतील, अशी माहिती अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी दिली.

Comments
Add Comment

Raigad : शारलोट लेक रिकामा, पर्यटनाचा हंगाम कोरडा; माथेरानकरांचा व्यवसाय ठप्प?

रायगड : पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलणाऱ्या माथेरानच्या पर्यटनाला यंदा शारलोट लेक रिकामा केल्याचा मोठा

Mumbai Goa Highway : कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात वाहनांवर पाण्याची गळती सुरूच

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भुयारी मार्गामध्ये

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर