एका उंदराने केले संपूर्ण शहराचे पाणीबंद, लोकांचे झाले मोठे हाल


चक्क एका उंदरामुळे संपूर्ण संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता.




संभाजीनगर: उंदरामुळे काय घडेल आणि काय नाही याचा नेम नाही. अलिकडेच पुण्यातील एका प्रसिद्ध नाट्यगृहाचे उंदीर प्रकरण ताजे असताना, आता  छत्रपती संभाजीनगरामधून एक विश्वास न बसणारी बातमी समोर आली आहे. चक्क एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा तब्बल 7 तास बंद झाला होता.


एका उंदरामुळे संभाजीनगरचा पाणीपुरवठा तब्बल 9 तास खंडित झाला होता. त्यामुळे पाणी न मिळाल्याने गुरूवारी रहिवाशांचे मोठे हाल झाले. जायकवाडी धरणातील नवीन पारोळा पंपगृह येथील पंपगृहात उंदीर शिरल्यामुळे दोन्ही फेस एकत्र होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा तब्बल 9 तास बंद होता. परिणामी अनेक भागात आज पाणी मिळू शकले नाही. शनिवारी देखील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.


नवीन फारोळा पंपगृह येथील इन्कमर 2 मध्ये स्पार्क होऊन पहाटे 4:25 वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यानंतर सर्व इन्कमर पॅनलची तपासणी केली असता इन्कमर 2 मध्ये उंदीर शिरल्यामुळे फेस टू फेस होऊन पंपिंग ट्रिप झाली झाल्याचे आढळून आले. उंदीर पॅनल बाहेर काढून ट्रायल घेते वेळेस सबस्टेशन मधील सप्लाय स्टँड होत नसल्याने ट्रान्सफॉर्मर चेकिंग काम करण्यासाठी तब्बल 9 तास लागले, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद असल्यामुळे आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही तर उद्याच्या पाणीपुरवठ्यावर देखील मोठा परिणाम होणार आहे.


महत्वाचं म्हणजे या अगोदर देखील काही महिन्यांपूर्वी एका सापामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. डीपीमध्ये साप गेल्याने यंत्रणेत बिघाड झाला  होता आणि त्याचाही परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला होता. वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून, पाणीपुरवठा यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा