पुणे शहराच्या प्रवेशद्वाराजवळचा रस्ता गेला पाण्याखाली!

पुणे : गेल्या दोन दिवसापासून शहर आणि परिसरात पडत असलेल्या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. या नद्या दुथड्या भरून वाहत असून खडकवासला तसेच पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.



मावळ येथील पवना धरणातून पाणी सोडले जात असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुणे शहराचे प्रवेशद्वाराजवळील आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या बोपोडी येथील हॅरीस पुलाखालील रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता हा रस्ता बंद करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी ही माहिती दिली.


गुरुवारी सकाळपासून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साठले होते. त्यामधून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. सतत पडत असलेला पाऊस आणि रस्त्यावर साठलेले पाणी यामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर झालेल्या या वाहतूक कोंडीचा फटका कामाला येताना आणि कामावरून घरी जाताना नागरिकांना बसला. गुरुवारी रात्री मध्यरात्री पर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.



प्रशासनाकडून हा रस्ता बंद


पुणे महापालिकेच्या औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत हा भाग येतो. पिंपरी चिंचवड शहराकडून पुणे महापालिकेच्या हद्दीत प्रवेश करून हॅरीस ब्रिजवरून बोपोडी, औंध तसेच पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी वाहनचालक या रस्त्याचा उपयोग करतात. दरवर्षी पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून हा रस्ता बंद केला जातो. यंदा जून महिन्यात पहिल्यांदाच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.



खडकवासला धरणातून नऊ हजार क्युसेक पाणी


खडकवासला धरणातून गुरुवारी दुपारी १ वाजता सुमारे २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर त्यामध्ये वाढ करत चार हजार क्युसेक तर रात्री उशिरा नऊ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत होते. त्यामुळे मुठा नदीच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अनावश्यक प्रवास आणि नदीकाठी फिरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात जनावरे अथवा तत्सम साहित्य असल्यास ते तातडीने काढून घ्यावे. पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांना योग्य सूचना देण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा