विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...

 

मुंबई :  राज्य सरकारच्या  समाजकल्याण विभागाने (social welfare) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिताचा निर्णय घेतलेला आहे, इयत्ता आठवीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे, अशी विद्यार्थ्यांच्या पालकांनी भावना व्यक्त केली. इयत्ता आठवी पासून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेयाचा आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन भरावेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.

तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात (student hostel) नव्याने बदल देखील करण्यात आलेत.  विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक इयत्तेनुसार पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, स्पर्धा परीक्षेच्या (सीईटी, नीट, एमपीएससी, युपीएसससी) तयारीसाठी पुस्तके, संगणक कक्ष, लायब्ररी, अभ्यासिका, अंतर्गत जीम, भोजन व शुद्ध पिण्याचे पाणी, प्रशस्त स्वच्छ निवासगृहे, क्रीडा साहित्यदेखील त्या वसतिगृहांमध्ये उपलब्ध असणार आहेत. तसेच  विद्यार्थ्यांसाठी २४ तास सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरदेखील उपलब्ध असणार आहेत.

तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना दरमहा ५०० निर्वाह भत्ता दिला जातो. तर जिल्हास्तरावरील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींना ६०० रुपये भत्ता दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्व अर्ज भरावेत असे समाज कल्याण विभागातील आयुक्तांनी आवाहन केले आहे. तसेच वसतिगृहात मागसवर्गीय मुलांना आणि मुंलीना प्रवेश घेता येणार आहे. तसेच मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना शहरात आणि ग्रामीण भागात राहण्यासाठी राज्य सरकारची भन्नाट योजना असल्याचे देखील बोललं जातं आहे.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४