Power Cut: कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये अनिश्चित काळासाठी वीजपुरवठा खंडित! महावितरणकडून महत्त्वाची अपडेट

भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड


कल्याण: कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या उपनगरांमधील वीजपुरवठा गेली तासभर अचानक खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात कुठलीही पूर्वसूचना देखील न आल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या संदर्भात महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भिवंडी-पडघा येथील 220 केवी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाली आहार. या सबस्टेशनमधील काही महत्त्वाच्या मशीनमध्ये अचानक स्पार्क झाल्याची घटना घडली असल्यामुळे विजेचा पुरवठा तात्काळ थांबवण्यात आला.


सध्या तांत्रिक कर्मचारी आणि अभियंते घटनास्थळी काम करत आहेत. मात्र, वीज नेमकी केव्हा येणार याबाबत अद्याप निश्चित वेळ सांगता आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अजून काही काळ अंधाराचा सामना करावा लागणार आहे. या अचानक झालेल्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे घरगुती कामे, व्यवसायिक उपक्रमांचे कामकाज ठप्प झाले आहे. नागरिकांनी महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा