IndiGo Flight Escapes Crash: पाटणा विमानतळावर इंडिगो विमानाचा अपघात थोडक्यात टळला, नेमके काय झाले होते?

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली


पाटणा: पाटणा विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला. दिल्लीहून येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला धावपट्टीवरून खाली उतरावे लागले. वैमानिकाने आपल्या सतर्कतेने विमान नियंत्रणाबाहेर जाण्यापासून वाचवले. त्याने ताबडतोब गो-अराउंड प्रक्रिया अवलंबली आणि विमान पुन्हा यशस्वीरित्या उतरवले.या विमानात एकूण १७३ प्रवासी होते. या घटनेमुळे पाटणा विमानतळाच्या लहान धावपट्टीवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजता दिल्लीहून येणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान ६ई २४८२ लँडिंग दरम्यान धावपट्टीच्या नियुक्त टचडाऊन झोनमधून बाहेर पडले. विमानाच्या मुख्य लँडिंग गियरने धावपट्टीला स्पर्श केला. मात्र विमान निश्चित जागेच्या पलीकडे गेले होते.  पायलटने मूल्यांकन केले तेव्हा त्यांना असे आढळून आले की, इतक्या लहान धावपट्टीवर विमानाचे लँडिंग शक्य नाही. त्यामुळे पायलटने पुन्हा विमान आकाशाकडे झेपवले. काही वेळ चक्कर मारल्यानंतर ते पुन्हा लँडिंग करण्यात आले. यावेळी लँडिंगमध्ये कोणतीही अडचण आली नाही.

लहान धावपट्टीच्या अंतरामुळे होणार होती दूर्घटना


जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री ९ वाजता लँडिंग होणारे विमान ६ई-२४८२ लँडिंग दरम्यान क्रॅश होता होता राहिले.  पाटणाच्या  धावपट्टीच्या लहान अंतरामुळे विमान सुरक्षित लँडिंग झोन ओलांडल्याचे लक्षात आल्याने सतर्क पायलटने लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि तपासणी सुरू केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, लँडिंग योग्यरित्या पूर्ण होऊ शकले नाही म्हणून वैमानिकाने मानक सुरक्षा प्रक्रिया पार पाडली. त्याआधी, धावपट्टीजवळ आल्यानंतर काही क्षणांत अचानक पुन्हा हवेत चढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

वैमानिकाने विमानाला जवळजवळ पाच मिनिटे हवेत ठेवले, दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षितपणे उतरण्यापूर्वी विमानतळाभोवती चार वेळा प्रदक्षिणा घातल्या. दरम्यान, विमानातील क्रू सदस्यांनी प्रवाशांची भीती कमी केली आणि त्यांना सांगितले की तांत्रिक कारणांमुळे विमान पुन्हा उड्डाण घेण्यात आले आहे आणि लवकरच ते उतरेल.

तज्ञांच्या मते, ‘’जर विमान धावपट्टी संपण्यापूर्वी थांबू शकत नसेल आणि धावपट्टीच्या पलीकडे जात असेल, तसेच जेव्हा विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर आवश्यक ब्रेक लावू शकत नसेल किंवा ते थांबवण्यासाठी थ्रस्ट रिव्हर्सल वापरू शकत नसेल तेव्हा असे घडते.’’

अलायन्स एअरच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी ताज्या


या घटनेने १७ जुलै २००० रोजी झालेल्या अलायन्स एअरच्या दुर्दैवी अपघाताच्या आठवणी ताज्या केल्या, जेव्हा कोलकाताहून दिल्लीला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे पाटणा विमानतळावर उतरू शकले नाही. विमान गरदानीबाग येथील निवासी निवासी इमारतींवर कोसळले होते, ज्यामध्ये सर्व क्रू मेंबर्स आणि जमिनीवर असलेल्या अनेकांसह ६६ जणांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा