महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव बदललं; सांगलीतील इस्लामपूर आता ईश्वरपूर!

सांगली : सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या गावाचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे आता इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर झाले आहे.


राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करावे ही हिंदुत्ववादी संघटना तसंच त्या शहरातील नागरिकांची सातत्यानं मागणी होती. ती मागणी सरकारनं मान्य केली आहे.


राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये शहराचं नाव बदलण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे ठेवण्यात आले. तसंच उस्मानबादचे नाव धाराशिव आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नावसुद्धा बदलण्यात आलं आहे. या बदलाचे स्वागत आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.


सदाभाऊ खोत म्हणाले की इस्लामपूरचे ईश्वरपूर नाव करण्यात यावे अशी माहिती मागणी आम्ही केली होती. वाळवा तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा मागणी नाव बदलण्यासंदर्भात केली होती. त्यामुळे ईश्वरपूरच्या लोकांचे मी अभिनंदन करतो, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.


Comments
Add Comment

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन