पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कसं ठार मारलं ?

श्रीनगर : पहलगाम येथे धर्म विचारुन २६ जणांची हत्या करण्यात आली होती. हे नृशंस हत्याकांड करणारे तीन दहशतवादी सुरक्षा पथकांना चकवत तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लपून होते. अखेर पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करणे त्यांना भोवले. दहशतवाद्यांनी वापरलेल्या चिनी यंत्रांचे सिग्नल भारताच्या सुरक्षा यंत्रणेने पकडले. यानंतर स्थानिकांच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आली. दहशतवादी नेमके कुठे लपले आहेत याची जास्तीत जास्त अचूक माहिती मिळवण्यात आली. ड्रोनचा वापर करुन परिसराची आकाशातून टेहळणी करण्यात आली.

दहशतवाद्यांनी चकमक होण्याआधीच्या १७ दिवसांत दोन वेळा पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांशी बोलण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला होता. अखेर दहशतवाद्यांची नेमकी स्थिती लक्षात आल्यावर सुरक्षा पथकांनी कारवाईची तयारी सुरू केली. श्रीनगरपासून काही किमी. अंतरावर असलेल्या दाचीगामच्या जंगलातील मुलनार येथे महादेव डोंगराजवळ लिडवास हे ठिकाण आहे. याच ठिकाणी दहशतवादी लपले होते. या भागात दीर्घकाळ लपणे शक्य आहे, यामुळे लवकर त्यांचा सुगावा लागला नही. पण सिग्नलच्या मदतीने सुरक्षा पथक दहशतवाद्यांचा माग काढू शकले.घेराव घालून दहशतवाद्यांची कोंडी करण्यात आली होती. पुरते अडचणीत सापडल्याची जाणीव होताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. चकमक झाली. या चकमकीत दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांकडून सुरक्षा पथकाने मोठा शस्त्रसाठा आणि चीनी बनावटीची संपर्क यंत्रणा यांची जप्ती केली.

सीमेवर पहारा असल्यामुळे दहशतवाद्यांना परत पाकिस्तानमध्ये जाणे कठीण झाले होते. यामुळे दहशतवादी डोंगराळ भागातील जंगलात लपले होते. ते वारंवार स्वतःची जागा बदलत होते. पाकिस्तानमध्ये संपर्क करण्यासाठी त्यांच्याकडून सॅटेलाइट फोनचा वापर सुरू होता. या फोनमुळेच दहशतवाद्यांना शोधणे सुरक्षा पथकांना सोपे झाले. पण मधल्या काळात काही दिवस दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन बंद केला होता. ते कोणाशीही फोनद्वारे संपर्क करणे टाळत होते. यामुळे त्यांचा माग काढण्यास वेळ लागला. पण सुरक्षा पथकांची खात्री झाल्यावर इन्फ्रारेड ड्रोनच्या मदतीने जंगलात तपासणी करण्यात आली. उष्णतेच्या मदतीने मानवी अस्तित्वाची माहिती सांगणाऱ्या या ड्रोनने जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याची जागा शोधण्यास सुरक्षा पथकाला मोलाची मदत केली होती. स्थानिकांनी दिलेली माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर दहशतवाद्यांच्या लपण्याचे नेमके ठिकाण शोधून सुरक्षा पथकाने धडक कारवाई केली.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा