‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’ संस्था कोल्हापुरात परत पाठवण्यासाठी सकारात्मक आहे, मात्र जोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिचे पुनरागमन शक्य होणार नाही, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर पालकमंत्री आबिटकर यांनी 'वनतारा' संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.


या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ‘वनतारा संस्थेच्या सीईओंनी करवीर मठाच्या महास्वामींना स्पष्टपणे सांगितले आहे की, महादेवीला कोल्हापुरातून नेण्याच्या संपूर्ण प्रकरणात वनताराचा कोणताही थेट संबंध नाही. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र आहेत आणि याचा आदर करून आम्ही महादेवीला परत देण्यास तयार आहोत.’


कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य
वनतारा संस्था महादेवीला परत देण्यास तयार असली तरी, या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यामध्ये न्यायालयाचे निर्देश आणि वनविभागाच्या परवानगी यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय महादेवीला कोल्हापुरात आणता येणार नाही, असेही आबिटकर यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा