Pune Velhe Taluka : ऐतिहासिक निर्णय! पुण्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरावर केंद्राचा शिक्का, काय असणार नवं नाव?

पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला (Velhe Taluka) आता नवं नाव मिळालं आहे. वेल्हे तालुका अधिकृतपणे ‘राजगड तालुका’ म्हणून ओळखला जाणार आहे. या नावबदलाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्याने ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांच्या इतिहासात महत्वाचं स्थान असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका वसलेला आहे. याच पार्श्वभूमीवर नाव बदलण्याची मागणी स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतींकडून सातत्याने होत होती. या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. तालुक्यातील ७० पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी तसेच पुणे जिल्हा परिषदेनं याला मंजुरी दिली होती. महसूल विभागानेही ठरावावर शिक्कामोर्तब करत राजपत्र प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका इतिहासाशी जोडला जात असून, ‘राजगड तालुका’ या नव्या नावाने महाराष्ट्राच्या प्रशासनिक नकाशावर नवी नोंद होणार आहे.




वेल्हे तालुक्याला मिळालं ऐतिहासिक ‘राजगड’ नाव


पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्याला अखेर इतिहासाशी जोडलेलं नवं नाव मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल २७ वर्षं स्वराज्याची राजधानी म्हणून जपलेला राजगड किल्ला, तोरणा यांसारखे दुर्ग या तालुक्यात असल्याने, या भागाला ‘राजगड तालुका’ असे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यातील नागरिक ही मागणी सातत्याने करत होते. अखेर या मागणीवर शिक्कामोर्तब झाल्याने स्थानिकांच्या भावनांना दिलासा मिळाला आहे. राजगड किल्ला स्वराज्याच्या इतिहासातील पहिली राजधानी असल्याने या तालुक्याला मिळालेलं नवं नाव अधिक गौरवशाली मानलं जात आहे.



७० ग्रामपंचायतींचा ठराव सफल


वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड’ करण्याच्या मागणीला अखेर केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. या निर्णयासाठी ७० पैकी तब्बल ५८ ग्रामपंचायतींनी सकारात्मक ठराव मंजूर केले होते. याशिवाय, पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेतही या बदलाला हिरवा कंदील देण्यात आला होता. पुढे पुणे विभागीय आयुक्तांनी ५ मे २०२२ रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. आता केंद्र सरकारने देखील ‘राजगड’ नावाला औपचारिक मान्यता दिली असून लवकरच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध होणार आहे. यामुळे इतिहासाशी निगडित मागणी पूर्ण झाली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा