मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

ठाणे : मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने चिरडल्याने तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. मुंब्रामधील गावदेवी बायपासजवळ ही अपघाताची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रामध्ये आज दुपारच्या सुमारास भयंकर अपघात झाला. गावदेवी बायपास परिसरात ३ मुलांना कंटेनरने चिरडलं. दुचाकीवरून ही तिन्ही मुलं चालले होते. त्यावेळी कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कंटेनरच्या चाकाखाली येऊन या तिन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. तिघांच्या मृतदेहांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

या अपघाताची माहिती मिळताच फायरब्रिगेड, रुग्णवाहिका आणि मुंब्रा पोलिसांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तिन्ही मुलं कामासाठी दुचाकीवरून ठाण्यातून शिळफाटा येथे जात होते त्याचवेळी ही भयंकर घटना घडली. मुंब्रा पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत मोठी गर्दी केली होती . त्यामुळे काही काळ घटनास्थळावर तणावाचे वातावरण होते. मुंब्रा बायपासवर नेहमी अशा प्रकारचे अपघात होत असतात. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा